परतीच्या पावसाने सोयाबीन व ईतर पिकांचे नुकसान

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पंचनामा करुन शेतक-यांना नुकसान भरपाई दयावी : रवि शिंदे

चंद्रपूर : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली आली आहे त्यामुळे शेतीचा पंचनामा करुन शेतक-यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविन्द्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे रवि शिंदे यांनी केली आहे.

वरोरा-भद्रावती तालुक्यात मागील काही दिवसांपासून परतीचा संततधार पाउस येत आहे. या पावसाने अनेक शेतक-यांचे नुकसान केले आहे. शेतात पावसाचे पाणी जमा झाले असुन सोयाबीन व ईतर पिक पाण्याखाली गेले आहे. पाण्याने सोयाबीन शेंगा खराब झाल्या असुन सडक्या झाल्या आहेत. परीणामी ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतक-यांचे आर्थीक नुकसान झाले आहे.

याची प्रत्यक्ष पाहणी दोन्ही तालुका प्रशासनाने करावी व वरोरा तथा भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थीक मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे.