चंद्रपूर : मागील पाच वर्षापासून सुरू असलेली चंद्रपुरातील दारबंदी हटविण्याचा निर्णय अखेर राज्यमंत्रिमंडळाने घेतला.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी हटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. जिल्ह्यातील दारुबंदीचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या. त्यांच्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने आज हा निर्णय घेतला.