चंद्रपूर | 261 कोरोनामुक्त तर 07 मृत्यू , 187 पॉझिटिव्ह

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 261 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 187 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 07 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 197 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 989 झाली आहे. सध्या
3हजार 778 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 66 हजार 643 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 81 हजार 438 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील साईबाबा वार्ड,सिव्हिल लाईन परिसरातील 48 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, मित्र नगर परिसरातील 68 वर्षीय महिला.
बल्लारपूर तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष तर ब्रह्मपुरी तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1430 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1326, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 187 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 47, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर 39, भद्रावती 15, ब्रम्हपुरी 15, नागभिड 06, सिंदेवाही 01, मूल 02, सावली 00, पोंभूर्णा 01, गोंडपिपरी 01, राजूरा 16, चिमूर 03, वरोरा 18, कोरपना 07, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 06 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.