चंद्रपूरमध्ये पुन्हा ‘चिअर्स’ आणि मद्यमाफियांचे गणित गडबडणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
जिल्ह्याची दारूबंदी उठवल्याने मद्यविक्रेते आणि मद्यपींमध्ये खुशीचा माहाैल असला तरी या निर्णयामुळे नागपूर, यवतमाळ आणि मध्यप्रदेशातील मद्यमाफियांना चांगलाच फटका बसणार आहे. नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपुरात दर आठवड्यात सुमारे दोन कोटींच्या मद्याची तस्करी केली जात होती, हे विशेष!

चंद्रपूर : अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुणवर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती.

मागील सरकारने दारू बंदी केली. मात्र अंमलबजावणी करू शकले नाही. तसेच आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून अवैध मार्गाने दारू येत होती. यामुळे समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली होती. अडीच लाख निवेदन “दारू बंदी उठवा’ असे तर 30 हजार दारू बंदी कायम ठेवा या मागणीसाठी आली होती. त्यानंतर पुन्हा एक समिती स्थापन केली होती. जिल्ह्यात क्राईम वाढले होते.

महिलांवर गुन्हे दाखल झाले होते. जनतेच्या सर्व घटकांसोबत बोलून झा समितीने अहवाल दिला होता. त्यानुसार दारू बंदी उठविली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यवतमाळ तसेच नागपुरातून अनेक गुंडांच्या टोळ्या मद्यमाफियांसोबत संगणमत करून दरदिवशी चंद्रपुरात वेगवेगळया मार्गाने मद्यतस्करी करीत होत्या. त्यांनी पोलिसांनाही हाताशी धरले होते. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी गणवेश धारण करून पॉश वाहनातून चंद्रपुरात मद्यसाठा पोहचविण्यासाठी मदत करायचे.
मद्यप्रदेशातील प्रतिबंधित मद्यही तेथे पोहचवले जात होते. त्यामुळे बार, वाईन शॉप बंद असले तरी चंद्रपुरात जागोजागी दारू मिळत होती. दारूबंदीमुळे मद्यमाफिया आणि गुंडांना बक्कळ पैसा मिळत असल्याने नागपुरातील अनेक कुख्यात गुंडांनी चंद्रपुरात बस्तान हलवून तेथेच आपले नेटवर्क तयार केले होते. आता दारूबंदी उठविल्यामुळे गुंड आणि मद्यमाफियांचे आर्थिक गणित.