वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

हत्तीनाल्यावर श्रमदानातून बांधला 50 मीटर लांबीचा वनराई बंधारा

चंद्रपूर : मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर मधील वनपरिक्षेत्र बल्हारशाह अंतर्गत नियतक्षेत्र इटोली कक्ष क्र. 508 हत्ती नाल्यावर आज श्रमदानातून वनराई बंधारा रविवारी तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी, वन्य प्राणी व पाळीव जनावरांची तृष्णा भागविण्याच्या उदेश्याने या बंधा-याची निर्मिती केली आहे. यावेळी मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार संजय राईचवर, सरपंच संगीता श्रावण सातपुते यांची उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सर्वप्रथम मा.श्री.अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपुर याचे शुभ हस्ते एक वड वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर इटोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, वनविभागाचे कर्मचारी, कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी व सेव फॉरेस्ट, सेव चंद्रपूर या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी वनराई बंधारा निर्माण कार्यात सहभागी झाले. साधारणतः 50 मी.लांबीचे व 2.5 मी. रुंदीचे वनराई बंधारा श्रमदानातून तयार करण्यात आले.सदर वनराई बंधारा तयार करण्यासाठी खाली सीमेंट बोरी 1500 नग स्थानिक नाल्यातील रेती व मातीचा वापर करण्यात आला. यामुळे हत्तींनाल्यातील पाणी अडविला जावून यामुळे वन्यप्राणी तसेच पाळीव प्राणी यांची तृष्णातृप्ती भागविण्याकरिता मोलाची मदत होईल.

मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी उपस्थिता सँबोधित करताना प्रतिपादन केले की सदर वनराई बंधारा अतिशय उत्कृष्ट झाला असून हे तयार करण्याकरिता कोणत्याही निधीचा वापर करण्यात आला नाही या बंधाऱ्यांमुळे वन्यप्राणी तसेच रब्बी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे पाण्याची सोय उपलब्ध करता येणे शक्य झाले आहे. लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करणे या स्तुत्य उपक्रमात वनविभाग उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामे केली याबद्दल वणविभागाचे कौतुक मा. जिल्हधिकारी यांनी केले.
श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्याचे काम श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र बल्हारशाह वनकर्मचारी व स्थानिक इटोली ग्रामस्थ यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.