काँग्रेसने लावलेल्या अच्छे दिनाच्या फलकाची चर्चा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मोदी सरकार दोनच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने वरोरा शहर काँग्रेसतर्फे पाच वर्षात पन्नास टक्के भाववाढ या मथळ्याखाली लावलेले फलक लक्ष वेधून घेत असून येथे चर्चेचा विषय झाला आहे.

या फलकात पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडरच्या दराची 2016 व 2021 वर्षाची तुलना करण्यात आली असून,’ पाच वर्षात 50 टक्के भाववाढ ‘ झाली असे सांगुन मोदी सरकारचे अच्छे दिन! असा उपहासात्मक प्रश्न करण्यात आला आहे.

याबाबत वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले म्हणाले, पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. डिझेल व गॅस सिलेंडरचे दरही दिवसागणिक वाढत आहे. यामुळे वाढत्या महागाईत तेल ओतले जाऊन सर्वसामान्यांची आर्थिक गणित पार बिघडून गेले आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य जनता आधीच आर्थिक संकटात सापडली असतांना त्यात महागाईचा भडका उडाला आहे.पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी विलास टिपले यांनी केली आहे.