चंद्रपूर | 171 कोरोनामुक्त तर 02 मृत्यू ,122 पॉझिटीव्ह

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : गत 24 तासात जिल्ह्यात 171 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 122 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 122 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 23, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 7, भद्रावती 10, ब्रम्हपुरी 12 , नागभिड 12, सिंदेवाही 4, मूल 4, सावली 4, पोंभुर्णा 2, गोंडपिपरी 4, राजुरा 2, चिमूर 7, वरोरा 14, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील साळवे कॉलनी परीसरातील 39 वर्षीय महिला तर पोभुंर्णा तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 87 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 467 झाली आहे. सध्या 1 हजार 128 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 10 हजार 605 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 23 हजार 113 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1492 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1381, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 40, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.