चंद्रपूर | 161 कोरोनामुक्त तर 03 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : गत 24 तासात जिल्ह्यात 161 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 56 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 3 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 56 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका 8, बल्लारपूर 8, भद्रावती 5, ब्रम्हपुरी 2 , नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 2, राजूरा 3, चिमूर 0, वरोरा 3, कोरपना 6, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 6 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील गणपती वार्ड,बल्लारपूर येथील 30 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील कुचना येथील 76 वर्षीय पुरुष तर ब्रम्हपुरी तालुक्यातील साई नगर येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 143 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 628 झाली आहे. सध्या 1 हजार 20 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 13 हजार 887 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 26 हजार 695 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1495 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1384, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 40, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.