अवकाळी पावसाने व जंगली जनावरांमुळे धान पिक जमिन उध्वस्त केली, धान पिकाला शेतकऱ्याने स्वतःच लावली आग

0
70

चिमूर :  शेतकरी आत्महत्या कशी थांबवावी याकडे सरकारचे लक्ष वेधले असतांना आज आत्महत्या थांबली परंतु नैसर्गिक आपत्ती ला कोण तारी अशी म्हण असतांना अवकाळी पावसाने व जंगली जनावरांमुळे धान पिक जमिन उध्वस्त केला असल्यामुळे धान पिकाला शेतकऱ्याने स्वतःच आग लावली असून शेतकरी मूरलीधर नथ्थुजी रामटेके मु.पो.सावरी(बिड)ता.चिमूर जि.चंद्रपूर येथील रहिवासी आहे.मजूर लावून मजुरांचे पैसे सुद्धा माल विकून देता येणार नाही.

आणि घेतलेला पिक कर्ज सुद्धा या धान पिकाच्या माध्यमातून देता येणार नाही अशी अवस्था धान पिकाची असतांना काहिच सुचेनासे झाले असतांना स्वतःच धान पिकास आग लावली असून चिमूर तालुक्यात हि प्रथमच घटना घडली असून शासन याकडे लक्ष देणार काय ? व शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळणार काय याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here